
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये पुतळा कोसळण्याच्या घटनेनंतर आता नव्याने बांधलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या जमिनीत भगदाड पडल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप जोर धरू लागले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फूट उंचीचा भव्य पुतळा मे 2025 मध्ये उभारण्यात आला. हा पुतळा गेल्या वर्षी कोसळलेल्या 40 फूट उंचीच्या पुतळ्याच्या जागी उभारला गेला. याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली. या पुतळ्याची एकूण उंची 83 फूट असून, चबुतऱ्याची उंची 10 फूट असल्याने हा पुतळा देशातील शिवरायांचा सर्वात उंच पुतळा मानला जातो.
मात्र अवघ्या काही महिन्यांतच या चबुतऱ्याच्या जमिनीत भगदाड पडल्याची घटना समोर आली आहे. स्थानिकांनी याबाबत तक्रारी केल्या असून, बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याचा आरोप केला आहे. मागील पुतळा कोसळण्यामागेही अशाच प्रकारच्या बांधकामातील त्रुटी आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, ज्यामुळे शिल्पकार जयदीप आपटे यांना अटक झाली होती.
View this post on Instagram