
दिल्लीतील प्रदूषण सध्या देशभरात चिंतेचा विषय ठरत आहे. दिल्लीतील प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी दिल्लीतील प्रदूषण धोकादायक वळणावर पोहचले आहे. त्यामुळे दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणखी खालावली आहे. प्रदूषणामुळे सकाळी दिल्लीतील अनेक भागात धुरक्याचा जाड थर पसरला आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे. तसेच नागरिकांना श्वसनाच्या समस्या जाणवत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे, आनंद विहार आणि अक्षरधाम भागात धुरक्याचा जाड थर पसरला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लोधी रोड आणि कर्तव्य पथवर पाणी शिंपडण्यात येत आहे.
दिल्लीतील प्रदूषण पातळी धोकादायक राहिली आहे. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि डोळ्यांना जळजळ होत आहे. आनंद विहार, अक्षरधाम आणि लोधी रोड सारख्या भागात AQI ‘खूपच खराब’ श्रेणीत नोंदवले गेले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) मते, सोमवारी आनंद विहारमध्ये ३७१ चा एक्यूआय नोंदवला गेला, जो ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत येतो. सीपीसीबीच्या आकडेवारीनुसार, अक्षरधाम परिसरातही धुरक्याचा थर पसरला होता, जिथे एक्यूआय ३४७ नोंदवला गेला होता, जो “अत्यंत खराब” श्रेणीत येतो. लोधी रोडवरही ३१२ नोंदवला गेला होता, जो “अत्यंत खराब” श्रेणीत येतो. तथापि, आयटीओच्या आसपासचा एक्यूआय १६० नोंदवला गेला होता. तो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. एम्स आणि सफदरजंग रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरात २१५ चा एक्यूआय नोंदवला गेला होता, जो ‘खराब’ श्रेणीत येतो. वाढत्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी, दिल्ली महानगरपालिकेने कर्तव्य पथावर ट्रकने पाणी शिंपडणारे स्प्रिंकलर्स तैनात केले आहेत. या भागातील एक्यूआय ३०७ नोंदवला गेला होता, जो ‘अत्यंत खराब’ श्रेणीत येतो. लोधी रोडवरही अशाच प्रकारची वाहने तैनात करण्यात आली आहेत, जी धूळ दाबण्यासाठी रस्त्यांवर पाणी फवारत आहेत.
#WATCH | Delhi | Truck-mounted water sprinkler deployed around Kartavya Path as a measure to mitigate pollution. AQI in the area is 307, categorised as ‘Very Poor’ by the Central Pollution Control Board (CPCB). pic.twitter.com/L22gzdZ1St
— ANI (@ANI) November 3, 2025
परदेशी नागरिक शेनने सांगितले की परिस्थिती खूप वाईट आहे. तो म्हणाला की तो आग्राहून बसने आला आणि दिल्लीच्या जवळ येताच धुके वाढत गेले. शेन म्हणाला की धुके इतके तीव्र होते की त्याला सूर्यही दिसू शकत नव्हता. दिल्लीचा स्थानिक रहिवासी सैफ म्हणाला की वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांना जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्याने सरकारने त्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.





























































