हिरडा, दुधाला रास्त भाव देण्याची मागणी; अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेचा मोर्चा

हिरडा व दुधाला रास्त भाव द्या, या मागणीसाठी अकोले तहसील कार्यालयावर किसान सभेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयासमोर दूध ओतून दूध दर वाढविण्याबाबत सरकार करत असलेल्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला.

हिरडयाची सरकारी खरेदी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून यासाठी आवश्यक आलेल्या 106 पेसा गावांचे ठराव आंदोलकांना गेल्या तीन दिवस सुरू आलेल्या ठिय्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्राप्त करून देण्यात आले. राहत्या घरांच्या तळ जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठी केलेली प्रकरणे 20 डिसेंबरपर्यंत तपासण्यात येतील असे यावेळी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे, भीमा मुठे, शिवराम लहामटे, तुळशीराम कातोरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.