
मुंबईत मेअखेरपासून सुरू असलेल्या पावसामुळे संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. या आजारांना आळा घालण्यासाठी पालिकेकडून घरोघरी सर्वेक्षण करून सुरू आहे. तर मागील दोन आठवड्यांत मलेरियाचे 341 तर डेंग्यूचे 48 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफाईड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया पसरत आहेत. पावसाळी आजार टाळण्यासाङ्गी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ङ्खेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावरील उघडे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे, हात धुवावेत, तर स्वाईन फ्लूपासून बचावासाङ्गी गर्दीत जाऊ नये, शिंकताना-खोकताना नाक-तोंडावर रुमाल धरावा. मास्क वापरावा.
पावसाळी आजारांसाङ्गी रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष
पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाङ्गी पालिकेने आपल्या अखत्यारीतील रुग्णालये सज्ज ङ्खेवली आहेत. यामध्ये महापालिकेने रुग्णांसाङ्गी प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालयांत तीन हजार बेड तैनात ङ्खेवले आहेत.
यामध्ये उपनगरीय रुग्णालयांत विशेष 500 बेडही तैनात आहेत. संध्याकाळी 4 ते 6 ओपीडी सुरू ङ्खेवण्यात येत आहे. शिवाय कीटकनाशक विभागाकडूनही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धूम्र फवारणी मोहीम व्यापकपणे राबवण्यात येत आहे.
‘भाग मच्छर भाग’
पावसाळी आजार रोखण्यासाङ्गी पालिकेकडून ‘भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवली जात आहे. यामध्ये डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा संदेश सेलिब्रिटींकडून व्हिडीओच्या माध्यमातून दिला जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.