
केंद्रीय निवडणूक आयोगाने 345 राजकीय पक्षांना मान्यताप्राप्त नोंदणीकृत रद्द करत राजकीय पक्षांच्या यादीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 नंतर एकही निवडणूक लढवली नाही आणि या पक्षांची कार्यालयेदेखील नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. देशभरात निवडणूक आयोगाकडे 2,800 नोंदणीकृत राजकीय पक्षांची नोंदणी आहे. त्यापैकी अनेक पक्ष नोंदणीकृत राजकीय पक्ष म्हणून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या अटी पूर्ण करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. हे लक्षात घेता, निवडणूक आयोगाने देशभरात पक्षांची ओळख पटविण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यामध्ये 345 पक्षांनी 2019 पासून लोकसभा, विधानसभा किंवा पोटनिवडणुकांमध्ये भाग घेतलेला नसल्याचे आढळून आले आहे. तसेच या पक्षांच्या कार्यालयाचा शोध घेतला असता ती आढळून आलेली नाहीत.