लग्न समारंभासाठी आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू, आंध्र प्रदेशमधली धक्कादायक घटना

लग्न समारंभात आलेल्या चार मुलांचा गाडीत गुदमरून मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

आंध्र प्रदेशच्या गोदावरी पूर्व जिल्ह्यात एक लग्न समारंभ होता. या समारंभात चार मुलं आली होती. खेळता खेळता मुलं बाहेर गेली आणि एका बेवारस गाडीत जाऊन बसली. अचानक ही गाडी लॉक झाली. या गाडीत या मुलांना श्वास घेता येत नव्हता. त्यातच या मुलांचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाला.

बराच वेळ झाला मुलं दिसली नाही म्हणून त्यांचे पालक हवालदिल झाले. त्यांचा शोध घेतल्यानंतर ही मुलं गाडीत सापडली. पण तेव्हा फार उशीर झाला होता. सर्व मुलं ही 6 ते 8 वर्षांची होती. त्यात एक मुलगा आणि तीन मुलींचा समावेश होता.