
दरवर्षी उन्हाळ्यात मुंबईत पाण्याची टंचाई निर्माण होते, त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. मुंबईला मिळणाऱ्या पाणी वाढावे म्हणून पालिकेने एक नवीन योजना हाती घेतली आहे. ही योजना कार्यान्वित झाली तर मुंबईला दरवर्षी 72 हजार दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.
प्रत्येक पावसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलाव ओव्हरफ्लो होतं. आणि हे पाणी मिठी नदीत प्रवाहित होतं समुद्राला जाऊन मिळतं. हे पाणी शु्द्ध करून पुन्हा वापरलं जाणार आहे. मान्सून काळात मुंबईतल्या तीन मोठे तलाव तुळशी, विहार आणि पवई तलावातील अतिरिक्त पाणी मिठी नदीत जातं. त्यामुळे धारावी, बीकेसी आणि कुर्ला भागात पाणी साचतं तसेच पूर परिस्थितीही निर्माण होतं. मुंबईतल्या पूर परिस्थितशी आणि पाणी टंचाईशी सामना करण्यासाठी पालिका एक पंपिग स्टेशन उभारणार आहे. या पंपिंग स्टेशनची क्षमता 200 दशलक्ष लिटर इतके आहे. यासाठी 100 कोटी रुपये खर्च होईल. या पंपिंग स्टेशनचे काम सुरू असून 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल.