
म्यानमारमध्ये पहाटे भूकंप झाला असून, (३० सप्टेंबर ) पहाटे झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.७ इतकी नोंदवण्यात आली. हे धक्के ईशान्येकडील राज्यांमध्ये, प्रामुख्याने मणिपूर, नागालँड आणि आसाममध्येही जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार, हा भूकंप सकाळी ६:१० वाजता झाला. भूकंपाचे केंद्र मणिपूरच्या २७ किलोमीटर आग्नेयेस उखरुल येथे जमिनीच्या पातळीपासून १५ किलोमीटर खाली होते. हे स्थान नागालँडमधील वोखापासून १५५ किलोमीटर आग्नेयेस आणि दिमापूरपासून १५९ किलोमीटर आग्नेयेस आहे.
(३० सप्टेंबर) रात्री उशिरा महाराष्ट्रातील सातारा येथेही भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र कोल्हापूरच्या वायव्येस ९१ किलोमीटर अंतरावर, ५ किलोमीटर खोलीवर होते. त्यानंतर पहाटे ४:२८ वाजता तिबेटमध्ये ३.३ तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
भूकंपाचे केंद्र मणिपूरच्या उखरुलपासून फक्त २७ किलोमीटर अंतरावर होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, हा भूकंप मणिपूरमधील उखरुलपासून फक्त २७ किलोमीटर आग्नेयेस, म्यानमारमधील हिंदुस्थाच्या सीमेजवळ होता. एनसीएसच्या मते, भूकंपाचे अचूक निर्देशांक २४.७३ उत्तर अक्षांश आणि ९४.६३ पूर्व रेखांश होते.