
ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील राजनगरम राष्ट्रीय महामार्गाजवळ सोमवारी हा अपघात घडला. पाच जण राजमुंद्री येथील दिवान चेरुवू भागातून कोव्वुरू येथे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात हलवताना मृत्यू झाला. अन्य दोघांची प्रकृती गंभीर आहे. ट्रकचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.