दीड महिन्यात 28 लाख भाविकांचे चारधाम दर्शन

चारधाम यात्रेला सुरुवात होऊन दीड महिना उलटला आहे. या दीड महिन्यात जवळपास 28 लाख भाविकांनी चारधाम यात्रेचे दर्शन केले आहे. या ठिकाणी दररोज 70 हजारांहून अधिक भाविक दर्शन करत आहेत. चारधाम यात्रेला 30 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री धाम या सर्व ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. केदारनाधमध्ये 10 लाख, बद्रीनाथमध्ये 7.80 लाख, गंगोत्री 4.53 लाख, यमुनोत्री 4.50 लाख आणि हेमकुंड साहिबमध्ये 95,700 भाविकांनी दर्शन केल्याची माहिती आहे.