कारण पंतप्रधान मोदींनी देशाचे भविष्य गहाण ठेवले आहे, राहुल गांधी यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची आर्थिक अवस्था बिकट झाली आहे, कारण पंतप्रधानांनी देशाचे भविष्य गहाण ठेवले आहे अशी टीका काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की,

रुपया : 95-100
स्टॉक्स : पडले
अर्थव्यवस्था : कोसळली
नोकऱ्या : गेल्या
उत्पन्न : घटतंय
बचत : संपल्या
सिलिंडर : उपलब्ध नाही
का?
पंतप्रधानांनी तडजोड स्वकारली (Compromised)

मोदी स्वतःला आणि आपल्या आर्थिक रचनेला वाचवण्यासाठी हतबल झाले आहेत. पण 140 कोटी हिंदुस्थानींना माहित आहे की पंतप्रधान मोदींनी देशाचे भविष्य गहाण ठेवले आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली.