
मोदी सरकार एकीकडे आपला 11 वर्षांचा कार्यकाळ साजरा करत आहे तर दुसरीकडे मुंबईत ट्रेनमधून पडून झालेल्या भयंकर अपघातात लोकांचा बळी जात आहे. हिंदुस्थानी रेल्वे करोडो लोकांच्या आयुष्याचा कणा आहे. परंतु आज हीच रेल्वे असुरक्षा, गर्दी आणि गैरसोयींचे आगार बनली आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारची 11 वर्षे इक्वल टू ना उत्तरदायी ना बदल केवळ प्रचार अशी परिस्थिती आहे. आता मोदी सरकार 2025बद्दल न बोलता 2047ची स्वप्ने विकत आहे. देश आज काय सोसत आहे ते कोण पाहणार, असा सवालही त्यांनी केला.