बाहेरून येणारे लोंढे आवरा – राज ठाकरे

रेल्वे अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्यापेक्षा रेल्वेमंत्र्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थिती बघावी. मुंबईत सातत्याने गर्दी वाढत आहे आणि त्याचा ताण लोकलवर पडत आहे. त्यामुळे लोकलचे दरवाजे बंद केले तर लोक गुदमरून मरतील. आज शहरांचे नियोजन विस्कटले आहे. प्रचंड लोंढे येत आहेत. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, ब्रिज, मेट्रो बांधली जात आहे. उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, पण पार्किंगचे नियोजन नाही. नवनवीन रस्ते, मेट्रो बांधून काहीही फरक पडत नाहीये, तरीही कुठलेच सरकार शहर नियोजनाचा किंवा बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा विचार करत नाही. परदेशात अशी घटना घडली असती, तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे मात्र काहीही नाही. मुंबईत रोज अशा घटना घडतात, माणसे मरतात, इथे माणसाच्या जिवाला किंमतच नाही अशी संतप्त प्रतिक्रीया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.