संविधानातून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाका, RSS च्या सरचिटणीसांची मागणी

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संविधान बदलण्याचे मनसुबे काही लपून राहिलेले नाही. भाजप आणि आरएएसच्या नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे याबाबत वाच्यता केली आहे. यामुळे विरोधकांना संविधान बचाव रॅली काढावी लागली होती. आताही आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे यांनी संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकण्याची मागणी करत वाद ओढवून घेतला आहे.

हे वाचा – घोषित आणि अघोषित आणीबाणीत फरक, शरद पवार यांचा सणसणीत टोला

आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आरएसएसचे सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत संविधानाच्या प्रस्तावनेतून ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द काढून टाकण्याची मागणी केली.

गेल्या 11 वर्षापासून देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? हर्षवर्धन सकपाळ यांचा सवाल