
हिंदुस्थानचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर असलेला संजू सॅमसन आशिया कपमध्ये नव्या भूमिकेत दिसणार आहे. केरळ क्रिकेट लीगमध्ये कोच्चि ब्लू टायगर्ससाठी त्याने सलामीऐवजी मध्यक्रमात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्याने आशिया कपसाठी घेतला आहे. आशिया कपसाठी संजूला 15 सदस्यांमध्ये स्थान असले तरी अंतिम 11 खेळाडू न खेळवणे कठीण आहे. कारण सलामीला अभिषेक शर्मासह शुभमन गिल उतरणार असल्यामुळे संजूचे सलामीचे स्थान धोक्यात आले आहे. त्यातून मार्ग निघावा म्हणून संजूने आपल्या क्रमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली असून, 4100 पेक्षा जास्त रन आणि 3 शतके ठोकली आहेत.