
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करतानाच वारंवार होणारे असे अपघात टाळण्यासाठी लोकलला तत्काळ ऑटोमेटिक दरवाजे बसवायला हवेत, असे मत व्यक्त केले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून केंद्रीय रेल्वे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घ्यायला हवी आणि मध्य रेल्वेनेही वेळेचे उत्तम नियोजन करून त्यानुसार महत्त्वाच्या मार्गांवर लोकल फेऱ्या वाढवायला हव्यात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.