
गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अहमदाबादमधील मेघानीमध्ये Air India चं विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची शंका वर्तवली जात आहे. अपघातस्थळावरून आकाशात धुराचे लोळ उठताना दिसत आहेत. विमान कोसळल्याचे कळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर लगेचच ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. अहमदाबादच्या मेघानी भागात हा अपघात झाला. या विमान अपघाताने शेअर बाजारालाही हादरा बसला आहे. अपघाताची बातमी येताच टाटा ग्रुपचे सर्व शेअर्स कोसळले. एअर इंडिया एअरलाइन कंपनी टाटा ग्रुपच्या मालकीची आहे. या अपघातानंतर टाटा ग्रुपच्या कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
या अपघातानंतर सर्वात मोठी घसरण टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा कंझ्युमर, टाटा इन्व्हेस्टमेंट आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. अपघाताच्या घटनेमुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण होते. या गोंधळामुळे अनेक गुंतवणूकदार त्या समुहाच्या शेअर्सची विक्री करतात. त्यामुळे शेअरच्या दरात घसरण होते.
टाटा समुहाच्या या शेअरमध्ये घरसण
TCS: 1% पेक्षा जास्त घसरण
टाटा स्टील: 3% ने घसरले
टाटा पॉवर: 2.5% ने घसरण
टाटा एलेक्ससी: 2% पेक्षा जास्त तोटा
टाटा कम्युनिकेशन्स: 1% पेक्षा जास्त घसरण
टाटा मोटर्स: 3% पेक्षा जास्त घसरण
टाटा केमिकल्स: 3% ने घसरण
टाटा कंझ्युमर: 2% पेक्षा जास्त घसरण
टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन: सुमारे 4% ने घसरण
इंडियन हॉटेल्स: 2% पेक्षा जास्त
मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादवरून लंडनला निघाले होते. यावेळी विमानतळावरून उड्डान घेतल्यानंतर काही वेळातच मेघानीजवळ हा अपघात झाला. अपघातावेळी या विमानामध्ये 242 प्रवासी असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिल्याचे वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.