उत्तरप्रदेशात एक विचित्र घटना समोर आली आहे. नववधूने नवरा सुंदर नाही, शिकलेला नाही आणि त्याचा रंगही काळा असल्याने मैत्रीणीही चेष्टा करतील सांगत लग्नास नकार दिला. एवढेच नाही तर नवरदेवाने लग्नाला नकार न दिल्यास तर पळून जाणार असल्याची धमकी नववधूने दिली आणि ज्यावेळी नवरदेवाने लग्नास नकार दिल्यानंतर वधूपक्षाने त्याची भयंकर अवस्था केली.
दिल्ली येथील निहाल विहार येथे राहणाऱ्या दुर्गा प्रसादने हुंडा न घेण्याच्या अटीवर कॅट येथील तरुणीशी विवाह ठरवला होता. सहा महिन्यांआधी तो आपल्या कुटुंबासोबत तरुणीच्या घरी तिळक आणि बाळंतपणाच्या समारंभासाठी गेले होते. या दरम्यान तरुणीने आपल्या होणाऱ्या नवरदेवाला सांगितले, ना तू सुंदर आहेस, ना शिकलेला आहेस आणि तुझा रंगही काळा आहे. तुला पाहून माझ्या मैत्रीणी माझी चेष्टा करतील. त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न करु शकत नाही. चांगले होईल तूच लग्नाला नकार दिलास तर. असे नाही केलेस तर मी पळून जाईन. त्यामुळे तुझे आणि तुझ्या घरच्यांची बदनामी होईल.नववधूचे अशाप्रकारचे बोलणे ऐकल्यावर नवरदेवाला धक्का बसला आणि त्याने लगेच लग्न करण्यास नकार दिला. नवरदेवाने लग्नाला अचानक नकार दिल्याने वधूपक्ष भडकला आणि वाद सुरु झाला. वधूच्या घरच्यांनी नवरदेवाकडचे सर्व सामान काढून घेतले आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.
दुर्गा प्रसाद असे त्या नवरदेवाचे नाव आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, नववधूचे म्हणणे ऐकून त्यांनी लग्नाला नकार दिला. यानंतर मुलीच्या मेहुण्याने दुर्गाप्रसादच्या कुटुंबीयांना मोबाईलवर शिवीगाळ करून खोट्या गुन्ह्यात तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. घरच्यांसोबत वाद मिटवण्यासाठी तो मुलीच्या घरी आला, पण काही निष्पन्न झाले नाही. याशिवाय वधूच्या कुटुंबीयांनी त्याला धर्मशाळेत नेले आणि दोन लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप वरपक्षाने केली. मात्र पैसे न दिल्याने त्यांना लाठ्या काठ्यांनी मारुन जखमी केले आणि त्यांचे सर्व सामान काढून घेतले. नवरदेवाच्या नातेवाईकांसोबत गैरवर्तन केले. जेव्हा नातेवाईकांनी पंचायतीत हे प्रकरण घेतले तेव्हाही त्यावर तोडगा निघाला नाही. अखेर नवरदेवाकडील लोकांनी न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशाने पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतर तपास सुरु झाला. नवरदेवाने आपली होणारी बायको आणि तिच्या नातेवाईकांविरोधात मारहाण आणि गैरवर्तन केल्याची तक्रार दाखल केली आहे.