
मुंबई महापालिका कांदिवली (पूर्व) येथे जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवणार आहे. त्यामुळे सोमवार, 2 जूनला दुपारी 1.30 वाजेपासून ते मंगळवार 3 जूनपर्यंत सकाळी 7.30 वाजेपर्यंत कांदिवली पूर्व आणि पश्चिम भागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, या परिसरातील रहिवाशांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेचे केले आहे. आर दक्षिण विभाग ः ठाकूर गाव, समतानगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.