
मुंब्रा स्थानकादरम्यान अपघात होऊन सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आता मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्याच्या लोकल असतील असा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईसाठी काही लोकल येणार आहेत तसेच ज्या लोकल धावत आहेत त्यांनाही हेच दरवाजे असतील अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
मुंब्राजळ झालेल्या अपघातानंतर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नीला म्हणाले की, मुंबईसाठी ज्या नव्या लोकल दाखल होणार आहेत त्यांना ऑटोमॅटिक दरवाजा बंद होईल अशा गाड्या असणार आहे. इतकेच नाही तर सध्या धावणाऱ्या लोकल्संना ICF द्वारे रेट्रोफिटमेटच्या माध्यमातून बंद होणारे दरवाजे बसवले जाणार आहेत अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली आहे.