
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर पर्यटकांनी जम्मू-कश्मीरकडे पाठ फिरवली होती. परंतु, आता कश्मीर प्रशासनाने प्रसिद्ध 48 पर्यटन स्थळांपैकी 16 पर्यटन स्थळे पुन्हा एकदा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जम्मू, श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग, भद्रवाह या प्रमुख पर्यटन स्थळांचा समावेश आहे. जम्मू-कश्मीरमध्ये ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.