
केदारनाथमधील गौरीकुंड मार्गावरील जंगलचट्टी येथे मोठी दुर्घटना घडली. भूस्खलन झाल्यामुळे पाच कामगार मातीच्या ढिगाऱयाखाली दबले असून यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत नितीन कुमार (18) आणि चंद्रशेखर या दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही पालखी मजूर म्हणून काम करत होते. तर संदीप कुमार, आकाश चितरीय आणि नितीन मन्हास अशी जखमी झालेल्या नागरिकांची नावे आहेत. डोंगराळ भागात ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफकडून मदतीसाठी मोहीम राबविण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने याआधीच 19 जूनला अनेक जिह्यांत पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला होता. 23 जूनपर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याने स्थानिकांनी अलर्ट राहावे, असा आवाहन करण्यात आले आहे.