
गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या पावसाने बुधवार रात्रीपासूनच जोर धरला आहे. मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. दादर, लोअर परेल, सायन तसेच ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल 20 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत. परिणामी सकाळी कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात आता पाणी साचायला सुरूवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही होताना दिसत आहे. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.तसेच मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.