आजपासून पाच दिवस समुद्राला उधाण; भरतीच्या वेळी किनाऱ्यावर जाऊ नका, पालिकेचे निर्देश

मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी पुढील पाच दिवस समुद्राला उधाण येणार आहे. या भरतीमध्ये समुद्रात 4.50 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे पर्यटक-मुंबईकरांनी किनाऱ्यावर जाऊ नये आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावर्षी पावसाळ्यात 19 वेळा समुद्राला मोठी भरती येणार असून यंदाच्या पावसाळ्यात 26 जून रोजी सर्वाधिक उंचीच्या म्हणजेच 4.75 मीटरच्या लाटा उसळणार आहेत. 

गुरुवारी वर्षातील सर्वात मोठी भरती

मुंबईत सात समुद्री चौपाटय़ा असून सुट्टीच्या दिवशी हजारो मुंबईकर-पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. मात्र अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी होण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून किनाऱ्यांवर लाइफ गार्ड तैनात करण्यात आलेला असतात. मात्र भरतीच्या वेळी धोका वाढत असल्याने भरतीच्या काळात नागरिकांनी समुद्रकिनारानजीक जाऊ नये आणि पालिकेने जाहीर केलेल्या सूचनांचे पालन करावे असे निर्देशही पालिकेने जारी केले आहे. जूनमधील समुद्राची भरती

z 24 जून सकाळी – 11.15 वाजता. लाटांची उंची 4.59 मीटर. 25 जून रोजी दुपारी – 12.05 वाजता. लाटांची उंची 4.71 मीटर. 26 जून रोजी दुपारी – 12.55 वाजता.

z 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. 27 जून रोजी दुपारी 1.40 वाजता. लाटांची उंची – 4.73 मीटर. 28 जून रोजी दुपारी 2.26 वाजता. लाटांची उंची – 4.64 मीटर.

जुलैमधील समुद्राची भरती

24 जुलै – सकाळी – 11.57 वा. लाटा 4.57 मीटर

25 जुलै – दुपारी – 12.40 वा. लाटा – 4.66 मीटर

26  जुलै – दुपारी –1.20 वा. लाटा – 4.67 मीटर

27 जुलै – दुपारी – 1.56 वा. लाटा – 4.60 मीटर