सकाळी फक्त 10 मिनिटे असे चालण्यामुळे आरोग्यासाठी होतील खूप सारे फायदे, वाचा

चालाल तर निरोगी राहाल हे वाक्य सध्याच्या घडीला परवलीचे वाक्य झालेले आहे. आपल्याला रोजच्या धावपळीत चालण्यासाठी वेळ मिळत नाही. घरातून आॅफिसला जाणे म्हणजे चालणे नव्हे, तर चालण्यासाठी आपण खास वेळ काढायला हवा. खासकरुन रोज किमान दहा मिनिटे हिरवळीवर चालण्यामुळे, आरोग्यासाठी खूप सारे फायदे मिळतात. हिरव्या गवतावर दवाचे थेंब असतील तर अधिकच उत्तम.

मानसिक आरोग्यासाठी व्यायाम करण्याचे अगणित फायदे, वाचा

हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याचे असंख्य फायदे आहेत. मुख्य म्हणजे या अशा प्रकारच्या चालण्यामुळे आपल्या शरीराला अनोखी उर्जा मिळते. दिवसभर आपण ताजेतवाने राहतो. मनावर असलेल्या नकारात्मक उर्जेचेही यामुळे निरसन होते. सकाळच्या प्रहरी हिरवळीवर चालण्यामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. यामुळे शारीरिक आणि मानसिक ताण कमी होतो.

ताजी हवा, कोवळे ऊन आणि शांत वातावरण सकाळी असते, म्हणूनच ही वेळ व्यायामासाठी अतिशय उत्तम मानली जाते. ताज्या हवेतील ऑक्सिजन मुळे आपले स्वास्थ्य सुधारते. कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन डी आपल्या शरीरास मिळते. तसेच सकाळच्या शांत वातावरणामुळे रिलॅक्स राहायलाही मदत मिळते.

हिरवळीचा हिरवा रंग शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करतात. पायाच्या तळव्यावरील बिंदूवर प्रेशर येणे हे आपल्या शरीरासाठी उत्तम असते. तळव्यावर पडलेल्या प्रेशरमुळे शरीरास खूप चांगले लाभ मिळतात.

विशेषतः डोळे, कान, फुफ्फुस, चेहरा, पोट, मेंदू, किडनी यांचे काही पाॅईटस् हे तळव्यामध्ये असतात. त्यामुळे हिरवळीवरून चालताना या अवयवांसाठी फायदेशीर ठरते. परिणामी निरोगी स्वास्थ्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो.

 

सकाळी हिरवळीवर चालण्यामुळे शरीराचे संतुलन सुधारण्यास मदत होते. आपण चालताना शरीराचा सारा भार आपल्या पायांवर असतो. विशेषतः पहिल्या बोटावर !

डोळ्यांचे आरोग्य सुधारणारे  रिफ्रॅक्सोलॉजी प्रेशर पॉईंटस दुसर्‍या आणि तिसर्‍या बोटामध्ये असते. त्यामुळे हिरवळीवर चालण्याचा सर्वाधिक फायदा डोळ्यांसाठी होतो.

 

चालण्याचा हा व्यायाम हिरवळीवर केल्यास तुमच्या आरोग्यास आणि विशेषतः डोळ्यांसाठी फारच फायदेशीर  ठरतो. मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यासोबतच आरोग्यदायी  कारणांसाठी नक्की सकाळी हिरवळीवर चाला.

नॅचरोपॅथी ही उपचारपद्धती निसर्गातील पंचभूतांशी निगडीत असते, त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी.  त्यातून येणार्‍या मॅगनेटीक लहरींमध्ये आरोग्यासाठी गुणकारी अशी उर्जा सामावलेली असते. त्याचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. पृथ्वी आणि या मॅगनेटीक लहरींच्या एकत्र येण्यामुळे शरीरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होते. परिणामी त्यातून उद्भवणारे आजार रोखण्यासही मदत होते. सकाळी अनवाणी गवतावर चालण्याचे शरीरासाठी इतके सारे फायदे आहेत. त्यामुळे आजपासून किमान 10 मिनिटे तुम्ही अनवाणी चालण्याची सवय लावून घ्या. जेणेकरून तुमचे आरोग्यही उत्तम सुधारेल.

(कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)