
पाणी हे जीवन आहे हे वाक्य आपल्या कानावर लहानापणापासून पडत आले आहे. पाण्याचं महत्त्व आपल्या शरीरासाठी अनन्यसाधारण आहे. मुख्य म्हणजे पाणी नसेल तर आपण जिवंतही राहू शकणार नाही. म्हणूनच शरीरासाठी पाणी हे मुख्य गरजांमध्ये येते. आपल्या शरीराल हायट्रेट राहण्यासाठी पाणी हे खूप गरजेचे आहे. पाणी पिण्यामुळे आपल्या शरीराचे अनेक आजार दूर होतात.
चहा किंवा काॅफी वारंवार पिण्याची सवय असेल तर, त्याआधी किमान एक ग्लास पाणी प्या. डिटाॅक्स केलेले पाणी पिण्यामुळे त्वचेला तजेला येतो. वयोमानानुसार, त्वचा ओलावा टिकवून ठेवण्यात कमकुवत होते. पण, पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचेत ओलावा टिकून राहतो. त्वचेचा रक्तसंचयही चांगला वाढण्यासाठी पाणी पिणे हे खूप गरजेचे आहे. पाणी पिण्यामुळे त्वचेचा पोतही सुधारतो आणि त्वचेचा रंगातही सुधार होतो.
दिवसातून किती ग्लास पाणी प्यावे?
- आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चयापचय, वजन, उंची आणि त्वचेसाठी दररोज 6 ते 8 ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचेचा घट्टपणा, चमक आणि तसेच त्वचेचे आरोग्यही उत्तम टिकून राहते.
- पाणी पिणे हे आपल्या त्वचेसाठी खूप गरजेचे आहे. जास्त पीएचमुळे त्वचा कोरडी पडू लागते. त्वचेचा पीएच राखण्यासाठीही पाणी पिणे हे खूपच फायदेशीर ठरते.
- शरीरात विषारी पदार्थांच्या उपस्थितीमुळे मुरुम, ऍलर्जी, तेलकट त्वचा होऊ शकते. हे विष बाहेर टाकण्यासाठी पाणी देखील प्यावे.
- पुरेसे पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा दोन्ही हायड्रेट राहते. त्यामुळे सुरकुत्या, भेगा पडत नाहीत. त्वचेचा तजेला टिकविण्यासाठी कोमट पाणी पिणे हे सर्वाधिक गरजेचे आहे.
(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)