
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटली तरी भिवंडीच्या बंगलापाडावासीयांच्या दुर्दशेचे फेरे संपलेले नाहीत. येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. शाळेपर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मालगाडीखालून वाकून जाऊन रुळ ओलांडावा लागत आहे.
भिवंडी तालुक्यातील खारबाव रेल्वे स्थानकाजवळ 40 घरांची वस्ती असलेला बंगला पाडा हा नॉच रिचेबल झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भुयारी मार्ग आणि ब्रीज नसल्याने येथील नागरिकांसह विद्यार्थी दररोज दिवा-वसई रेल्वेमार्गावरील रुळ ओलांडून प्रवास करावा लागत आहे, तर कधी रेल्वे रुळांवर उभ्या असलेल्या मालगाडी खालून त्यांना जागे लागत आहे.
पावसाळ्यात रेल्वे पुलाखाली पाणी जमा होते. तसेच कॉरिडॉर रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने तो मार्गही बंद असतो. वाहनांसाठीही रस्ता नसल्यामुळे एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे असेल तर रुग्णाला उचलून रेल्वे रुळ ओलांडून रुग्णालयात जावे लागते.