
वासिंद ते आसनगावदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी रात्री रेल्वे वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे ऐन पावसात हाल झाले. रेल्वेच्या कर्मचार्यांनी तब्बल एक तासाने कसार्याहून दुसरे इंजिन मागवले. नंतर मालगाडी आसनगावच्या दिशेने रवाना झाली.
इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली. यामुळे कसाराकडे जाणार्या लोकलसह मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेससह लांबपल्याच्या अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.