
हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबाबत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी चिंता व्यक्त केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर भावना भडकणे स्वाभाविक होते. परंतु, आता लष्करी संघर्ष टाळण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे गुटेरीयस यांनी म्हटले आहे. गुटेरस यांनी दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे.