
आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश आता दुसरा गाल पुढे करणार नाही, जशास तसे उत्तर देऊ अशा शब्दांत काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. पनामा येथील हिंदुस्थानी दुतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात थरूर बोलत होते. ऑपरेशन सिंदूरचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पनामा येथे गेले आहे. यावेळी थरूर यांनी महात्मा गांधींच्या भीतीशिवाय जगण्याच्या शिकवणीवर भाष्य केले.