
1971 हे वर्ष भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचा आणि पराक्रमाचा साक्षीदार आहे. त्यावेळी आपले नौदल पुढे सरसावले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारतीय नौदल पाकिस्तानविरोधात पूर्ण क्षमतेने उतरले असते तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते, असे भारतीय नौदलाचे कौतुक करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय सैन्यदलाचे कौतुक करण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी गोव्याच्या किनाऱ्यावर विमानवाहू युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’वरील अधिकारी आणि खलाशांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
पाकिस्तान चर्चा करण्यासाठी गंभीर असेल तर त्यांनी आधी ‘26/11’ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावे. तसेच पाकिस्तानने यावेळी कुठलीही नापाक हरकत केली तर कदाचित त्यांच्याविरोधात भारतीय नौदल ओपनिंग करू शकते, असा इशाराही त्यांनी पाकड्यांना दिला.