
इंग्लंडविरुद्ध धमाकेदार कामगिरी करण्यासाठी टीम इंडियाचा जोरदार सराव सुरू आहे. बेकेनहॅममध्ये टीम इंडिया आपआपसात चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्यात इंडिया ए कडून खेळताना सरफराज खानने आपल्या फलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केलं आहे. त्याने 76 चेंडूमध्ये 101 धावांनी नाबाद खेळी करत जसप्रती बुमराह आणि अर्शदिप सिंग सारख्या टीम इंडियाच्या मुख्य गोलंदाजांना समचारा घेतला.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पहिला कसोटी सामना सुरू होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया आपआपसाच चार दिवसीय सराव सामना खेळत आहे. इंडिया ए कडून खेळताना सरफराज खानव्यतिरिक्त इशान किशन आणि शार्दुल ठाकूर यांनी सुद्धा चमकदार कामगिरी केली. इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 459 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंडिया ए च्या फलंदाजांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. सरफराज खानने 76 चेंडूंचा सामना करत 15 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावांची शतकीय खेळी केली. त्याचबरोबर इशान किशन सुद्धा संयमी फलंदाजी करताना दिसत असून आला, तो 45 धावांवर नाबाद आहे. इंडिया ए ने दिवसाअखेर सहा गड्यांच्या मोबदल्यात 299 धावा केल्या आहेत.
IND Vs ENG Test – सचिन तेंडुलकरने जिंकलं सर्वांच मन, पतौडी नावाचा दबदबा कायम राहणार!