
छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी इंडिगोच्या विमानात मोठी तांत्रिक अडचण उद्भवली. दिल्लीहून रायपूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे दार तांत्रिक बिघाडामुळे अंदाजे 40 मिनिटे उघडले गेले नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, आमदार चतुरी नंद, रायपूरच्या महापौर मीनल चौबे यांच्यासह शंभरहून अधिक प्रवासी विमानात अडकून पडले.
इंडिगो विमान दुपारी 2:25 वाजता रायपूर विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं. मात्र विमानाच्या दरवाज्यातील तांत्रिक बिघाडामुळे तो उघडला जाऊ शकला नाही. परिणामी यात्रींना रनवेवर विमानातच बसून राहावे लागले. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली. अभियंत्यांनी सुमारे 40 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर दार उघडले, आणि सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर पडले. कोणालाही कोणतीही इजा झाली नाही.
भूपेश बघेल जे या विमानातून प्रवास करत होते, त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, “तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे दार उघडण्यास विलंब झाला. सुमारे 40 मिनिटे आम्हाला विमानातच थांबावे लागले. अभियंत्यांनी ही समस्या सोडवली आणि सर्व यात्री सुरक्षितपणे बाहेर पडले.”