
अमृतसर-पूर्णिया जनसेवा एक्सप्रेसमध्ये भीषण आगीची घटना समोर आली आहे. सोनवर्षा कचरी स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. एक्सप्रेसच्या एका कोचला आग लागल्याने रेल्वे तात्काळ थांबवण्यात आली. आगीची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत आग विझवण्यास सुरवात केली. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. आग विझवल्यानंतर, ट्रेन सुरक्षितपणे सहरसा स्थानकावर आणण्यात आली.
अमृतसरहून सहरलाला जात असतानाच ही घटना घडली. आगीत एक्सप्रेसचा एक डबा जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच, रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या घटनेनंतर जनसेवा एक्सप्रेसच्या सर्व डब्यांची तपासणी केली जात आहे. आगीमुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

























































