पाकिस्तानने राफेल पाडल्याचा दावा किती खरा? विमाने मोजू का देत नाही, विरोधकांचा सरकारला सवाल

rafel-deal

पहलगाम हल्ल्यानंतर लष्कराने ऑपरेशन सिंदूरचा तडाखा देत पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्ताननेही हिंदुस्थानातील लष्करी तळ आणि नागरी वस्त्यांवर केलेले हल्ले परतवून लावण्यात आले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानची पाच राफेल ही लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला. परंतु, मोदी सरकारने हा दावा फेटाळून लावला आहे. आता पाकिस्तानच्या एअर व्हाईस मार्शलनेही विमाने पाडल्याचा दावा केला आहे. त्यामुळे मोदी सरकार लढाऊ विमाने का मोजू देत नाही, असा सवाल आता विरोधकांनी केला आहे.पाकिस्तानी सैन्याने किती राफेल विमाने पाडली याची माहिती मोदी यांनी द्यावी अशी मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केली आहे.