संगमेश्वर शास्त्री नदीच्या विळख्यात

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधारेमुळे जिह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी पार केली असून संगमेश्वरमधील शास्त्री नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्यामुळे संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ बाजारपेठ पूर्णतः जलमय झाली आहे. संगमेश्वर-नायरी मार्गावर कसबा येथे पुराचे पाणी आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी आज पावसाने थैमान घातल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणेदेखील अवघड झाले होते.

कुरधुंड्यात संरक्षक भिंतीला तडे

संगमेश्वर येथील मुंबई – गोवा महामार्गावरील कुरधुंडा येथे संरक्षण भिंतीला तडे गेल्याने ती धोकादायक बनली आहे. ही भिंत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्गमध्ये पडझड

पावसामुळे सिंधुदुर्गात मोठी पडझड झाली. जिल्हा प्रशासनाने आवश्यक सुविधा सज्ज ठेवल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.