Ratnagiri Rain News – भारजा नदीला पूर, मांदिवली येथील पूल पाण्याखाली; वाहतूक थांबली

रत्नागिरी सिंधुदूर्ग जिल्ह्यांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला आहे. दापोली तालुक्यातील भारजा नदीला पूर आल्याने दापोली आणि मंडणगड तालुक्यांना जोडणारा मांदिवली पूर पाण्याखाली गेला आहे. पुलावरुन पाणी वाहू लागल्याने पुलावरून वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लांगल्या आहेत.

दापोली तालुक्यातील भारजा नदीवरील मांदिवली पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने पुलावरून होणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजुकडे वाहनांच्या रांगा लागल्या. पुलावरून वाहणारे पुराचे पाणी कमी होण्याची वाट पाहत वाहन चालकांसह प्रवाशांना थांबावे लागले. दरवर्षी पावसाळ्यात मांदिवली पुलावरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे पुलाची पुनर्बांधणी करून पुलाची उंची वाढवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.