पुन्हा पाढे पंचावन्न, बदली झाल्यानंतरही IAS अधिकारी शुभम गुप्ता यांचे कारनामे संपेना; आता सांगलीत लाच घेतल्याचा आरोप

गडचिरोलीत आदिवासांनी गाय वाटप योजनेत घोटाळा झाला होता. त्याप्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्ता यांची बदली सांगलीत करण्यात आली होती. सांगलीत आल्यानंतरी गुप्ता यांचे कारनामे संपताना दिसत नाहिये. महापालिकेचे उपायुक्त वैभव साळवे यांनी सात लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती. या प्रकरणात शुभम गुप्ता यांना सहआरोपी करा अशी मागणी होत आहे. तसेच 200 ते 250 कोटींच्या ठेवी गुप्ता यांनी खासगी बँकेत वळवल्या आसा आरोपही त्यांच्यावर होत आहे.

धुळे, गडचिरोलीहून बदली होऊन शुभम गुप्ता यांची सांगलीत बदली करण्यात आली. पण त्यांच्या कारभारावर खासदार विशाल पाटील आणि आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. महापालिकेच्या भूमी संपादनात कोट्यवधी रुपये संशयास्पदरित्या हे मूळ मालकाला दिले गेले नाही. त्याऐवजी वट मुक्तानंदराना पैसै देऊन भ्रष्टाचार झाल्याच आरोप झाला. इतकंच नाही तर महापालिकेच्या 200-250 कोटी रुपयांच्या ठेवी या नॅशनल बँकेत होत्या. पण गुप्ता यांनी या ठेवी एका खासगी बँकेत ठेवल्या. गुप्ता यांनीच महापालिकेच्या आपात्कालीन निधीतून स्वतःसाठी गाडी विकत घेतली होती. ठेकेदारांचे चेक काढण्यासाठी त्यांच्याकडून टक्केवारी घेतल्याचाही आरोप त्यांच्यावर झाले होते.