सरन्यायाधीश साहेब, दैनिक ‘सामना’त आज प्रसिद्ध झालेला अग्रलेख अवलोकनार्थ पाठवत आहे; संजय राऊत यांचे भूषण गवईंना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना विशेष अभिनंदन करण्यासाठी पत्र लिहिले आहे. संजय राऊत यांनी हे पत्र ट्विट करत माहिती दिली आहे.

तेलंगणातील 10 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठाने परखड मत व्यक्त केले. मूळ राजकीय पक्षाशी बेइमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखले नाही तर, लोकशाहीचे नुकसान होईल. विधानसभेचे अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती असल्याने ते बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया लांबवतात हे आपले निरीक्षण अंधारात ढकललेल्या लोकशाहीला आशेचे किरण दाखवणारे आहे त्याबद्दल आपले अभिनंदन, असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

माननीय सरन्यायाधीश साहेब, आज रोजी (2 ऑगस्ट 2025) दैनिक ‘सामना’त प्रसिद्ध झालेला याच विषयावरील अग्रलेख ‘जे बोललात ते करा!’) आपल्या अवलोकनार्थ पाठवीत आहे. अग्रलेखातील भावना या महाराष्ट्राच्या नव्हे, तर देशाच्या लोकभावना आहेत, असेही संजय राऊत यांनी पत्रात नमूद केले आहे.

सामना अग्रलेख – सरन्यायाधीश साहेब, जे बोललात ते करा!