
पोर्ट ट्रस्टच्या नियमानुसार मान्सून दरम्यान कोणत्याही कामाला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब दरम्यान बांधण्यात येणाऱ्या जेट्टीचे काम सध्या बंद असल्याची माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी आज हायकोर्टात दिली.
राज्य सरकारकडून सुमारे 229 कोटी रुपये खर्चून गेटवे ऑफ इंडिया आणि रेडिओ क्लब दरम्यान जेट्टी व टर्मिनलची उभारणी केली जाणार आहे मार्च महिन्यात भाजप मंत्री नितेश राणे यांच्या मार्फत या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर हा प्रकल्प वादात सापडला. मात्र आवश्यक त्या मंजुऱ्या न घेताच काम सुरू करण्यात आल्याचा दावा करत क्लीन हेरिटेज कुलाबा रहिवासी असोसिएशनने (सीएचसीआरए) याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.