एप्रिलमध्ये वोडाफोनने 6.5 लाख ग्राहक गमावले

एप्रिल महिन्यात टेलिकॉम कंपनी वोडाफोनला जोरदार झटका बसला आहे. कंपनीने अवघ्या एका महिन्यात 6.5 लाख ग्राहक गमावले आहेत. तर भारती एअलटेलने 1 लाख 70 हजार नवीन ग्राहक जोडण्यात यश मिळवले आहे. रिलायन्सला जबरदस्त फायदा झाला असून जिओने 26 लाख 44 हजार नवीन ग्राहक जोडले आहेत, अशी माहिती ट्रायने दिली आहे. देशभरात सध्या एकूण 115 कोटी 89 लाख मोबाईल कनेक्शन आहेत. एप्रिल 2025 मध्ये गुजरात, बिहार आणि दिल्ली सर्कलमध्ये सर्वात जास्त ग्राहक जोडले गेले आहेत.