
इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या (ISPL) दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद माझी मुंबई संघाने जिंकले. ठाण्यातील दादोजी कोंडदेव मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात मुंबईने श्रीनगराच 3 विकेट्ने पराभव केला आणि चषक जिंकला.
श्रीनगरने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 विकेट्स मगावून 120 धावा केल्या होत्या. हे आव्हान मुंबईने लिलया पार केले. सागर अली आणि आकाश तारेकरने मुंबईला 108 धावांची सलामी दिली. त्यानंतर पुढील 12 धावा करतना मुंबईची दमछाक झाली. मुंबईने या काळात 5 विकेट गमावल्या. मात्र कर्णधार पावलेने 9 चेंडूत 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.