
महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या या सरकारला पनवती सरकार म्हणायला हरकत नाही असेही संजय राऊत म्हणाले.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषद म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली आहे. केंद्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या या सरकारला पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले सुरू आहेत. ऑपरेशन सिंदूर झालं त्यात पूंछला 17 लोक मारले गेले. त्याआधी पहलगाम हल्ला झाला त्यात 26 महिलांचं कुंकू पुसलं गेलं. अहमदाबादमध्ये भयानक अपघात झाला, तो अपघात होता की आणखी काही याचा तपास सुरू आहे. त्यातही महाराष्ट्राचे 15-16 लोक मरण पावले. काल राज्यात दोन दुर्घटना घडल्या. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदी यांनी बसवला होता तो आधी कोसळला. त्यात आधी भ्रष्टाचार झाला होता. त्यानंतर सरकारने मोठा गाजावाजा करत काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला. काल जे चित्र समोर आलं. आता एक महिन्यापूर्वी त्या पुतळ्याचे उद्घाटन केलं. आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा आणि जमीन ज्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. समुद्रावर यापूर्वी किल्लेही बांधले गेले आहेत. गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेला शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रातच आहे. आणि त्या पुतळ्याला 60 वर्षांपेक्षा जास्त काळा झाला आहे. तसं पाहिलं तर शिवतीर्थावरचा पुतळाही समुद्रातच आहे. हे सगळे पुतळे सुरक्षिते आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झालेला नाही. पण मालवणच्या पुतळ्यात पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का? हे पैसे कुठे वळवले का? ही शंका लोकांना येत आहे. त्यानंतर दुसरी आणि गंभीर घटना पुण्यात झाली. मावळ भागातल्या कुंडमळामध्ये त्यातल्या इंद्रायणी नदीतला एक पूल कोसळला, वाहून गेला. आणि यात किती लोक मृत्यू पावले याचा खरा आकडा बाहेर आलेला नाही. लोकं वाहून गेले. त्या पुलावर 100 पेक्षा जास्त पर्यटक उपस्थित होते आणि तो पूल कोसळला. यात किमान 50 लोक वाहून गेले. पाच मृतदेह सापडले. विकाच्या गोष्टी करता आपण. माझा प्रश्न अजित पवारांना आहे. अनेक वर्ष त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजित पवार आहेत. आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचा त्यांना गर्व आणि अहंकारसुद्धा आहे. मी आणि पुणे जिल्हा कुणी वेगळा करू शकत नाही असं त्यांना वाटत असावं. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी पालकमंत्री म्हणून अजित पवार तुम्ही घेणार आहात की झटकून टाकणार? कारण आम्ही पाहिलं अजित पवार एका पत्रकाराला दम देत होते. त्यांना सगळंच माहित असतं. मग त्यांना हा पूल जुना झाला आहे, आणि त्या ठिकाणी सुनील शेळके नावाचा आपला आमदार आहे, ज्याला ते घेऊन फिरत असतात. ज्याच्या निवडणुकीवर कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत. पण एक दोन कोटींचा पूल गेल्या अनेक वर्षात पालकमंत्री उभा करू शकले नाहीत. पालकमंत्री अशा लहान सहान कामात झोकलेले असतात आणि ही मोठी बिल्डरांची कामं, मेट्रोची कामं मोठ्या ठेकेदारांची कामं यात पालकमंत्री जागे असतात बाकी झोपलेले असतात. काल जे बळी गेले त्याला जबाबदार कोण? हे अजित दादांनी सांगितलं पाहिजे. आणि सरकार या बाबतीमध्ये किती गंभीर आहे. कागदावरती हे पैसे मंजूर झाले आहेत, किती? त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने कागदावर पैसे मंजूर केले आहेत. मग पूल का नाही झाला? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? बाकी सगळ्या गोष्टींना पैसे मिळत आहेत मतं विकत घेण्यासाठी. आमदार, खासदार विकत घ्यायला कोट्यवधी रुपये मिळताहेत. लाडक्या बहीणींची मतं विकत घ्यायला पैसे मिळत आहेत. पण काल एका पुलामुळे 40 लोकांचे बळी गेले तो पूल दुरुस्त करायला पैसे नव्हते. माझ्याकडे एक पत्र आहे, 11 जुलै 2024 रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री. त्यांनी या कामाला परवानगी दिली होती. ही बाब त्यांनी भाजपचे मावळ अध्यक्ष रवींद्र भेंगडे यांना कळवले होते. मंत्री सही करताना सुद्धा किती गंभीर नसतात, झोपून असतात. आठ कोटी रुपयांचे काम होतं असं मी ऐकलंय आणि पत्रावर सही आहे 80 हजार रुपये. भाजपचे मावळचे अध्यक्ष ते पत्र हसत हसत दाखवतात. काल को पूल कोसळला आणि लोक वाहून गेले. हे या सरकरारचं, मंत्र्यांचं, पुढाऱ्यांचं जनेतप्रती असेलेलं प्रेम. अजित पवार याबाबत काही बोलल्याचं पाहिलं नाही याबाबतीत. नाही तर मोठ्या तावातावाने बोलत असतात. कुठे आहेत अजित पवार, कुठे आहेत सुनील शेळके? अजित पवारांना शरद पवारांना तोडण्यासाठी जे आमदार पुढे होते त्यात शेळकेही होते. शरद पवारांच्या तिकीटार निवडून आले आणि अजित पवारांसोबत गेले तेच ते आमदार. पण आपल्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे, काय धोकादायक बांधकाम आहे, काय विकास करायचा याचा काही विचार नाही. आमचे राज्याचा मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री काय करतात याची चौकशी केली पाहिजे. तु्म्ही आल्यापासून राज्यात दुर्घटनांची मालिका सुरू आहे असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. त्यावर संजय राऊत म्हणाले की, अधिकृतपणे भेटण्याची जागा आणि शासकीय भेटीसाठी मंत्रालय किंवा वर्षा बंगला असतो. इतर बैठकीसाठी गोपनीय, व्यापारी, उद्योग त्यासाठी खासगी बैठका होतात. काल ताज लँड्सच्या लॉबीमध्ये मुंबईतले अनेक बिल्डर उपस्थित होते. ते नक्की कोणाला भेटायला आले होते मला माहित नाही. पण मुंबईतले अनेक बिल्डर जे भाजपशी संबंधित आहेत लवकरच मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या शासकीय इमारती या बिल्डरांना दिल्या जाणार आहेत. हे बिल्डर भाजपशी संबंधित आहेत का? त्याच्यामध्ये म्हाडाची इमारत सुद्धा आहे . तसेच मुख्यमंत्री तिथे जेव्हा आले ते कोणाला भेटायला येणार मला माहित नाही. पण तिथे आधीपासून आणि शेवटपर्यंत मुंबईतील अनेक बिल्डर उपस्थित होते का? मी आता सांगत नाही असेही संजय राऊत म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेकदा स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकांवर ठरत असतात. पवार साहेबांच म्हणणं बरोबर आहे की, कार्यकर्त्यांना खाली विश्वासात घ्यावं लागतं. त्यांच्या खाली काय तडजोडी आहेत, काय भूमिका आहेत आणि शिवसेनेच्या बाबतीत सुद्धा आम्ही तीच भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक महानगरपालिका हद्दीतला धोरण वेगळं असू शकतं. मुंबईत वेगळा असेल ठाण्यात वेगळा असेल. कोणाबरोबर आमचा मुख्य शत्रू जो आहे हा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्याबरोबरचे असलेले हे सगळे टपोरी टोळ्या. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी कोणाची मदत घेऊ असेही संजय राऊत यांनी नमूद केले.