
विधानसभा निवडणुकांमध्ये कर्जमाफीचे आश्वासन देणाऱ्या सरकारला आता मात्र शेतकऱयांचा विसर पडला आहे. यातच कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीने मातीमोल झालेल्या शेतीमुळे सरकारकडून कर्जमाफीची आशा बाळगून असणाऱया शेतकऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आश्वासनावरच बोळवण केली आहे. ‘कर्जमाफी योग्य वेळ आल्यावर होईल,’ असे ते आज पुण्यात म्हणाले.