मुंबईचा पाणीसाठा पोहोचला 27 टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये आज 3 लाख 88 हजार 523 दशलक्ष लिटर म्हणजे 27 टक्के इतका पाणीसाठा पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांत आटलेला पाणीसाठा 8 टक्क्यांवरून आता 26.84 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात संततधार सुरू असल्यामुळे तलाव क्षेत्रातही पुरेसा पाऊस झाल्यामुळे तुळशी, विहार, तानसा, भातसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा आणि मोडक सागर या तलावांच्या पाणीसाठय़ात वाढ झाली आहे.