
हवामान बदलू लागते तेव्हा त्याचा आपला आरोग्यावर थेट परिणाम होतो. बदलत्या हवामानात आपण आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेतली नाही तर आजारी पडण्याचा धोका आणखी वाढतो. बदलत्या हवामानात आजारांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर काही घरगुती उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. हळद ही आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम मानली जाते.
आयुर्वेदाने नेहमीच अन्नात हळदीचा वापर करण्याची शिफारस केली आहे. यामागील एक मुख्य कारण म्हणजे त्यात कर्क्यूमिन नावाचा एक शक्तिशाली घटक असतो, जो तुमच्या शरीराला संसर्गाशी लढण्यास आणि टिकून राहण्यास मदत करतो. हळदीचे सेवन केल्याने तुमच्या शरीराचे जळजळ होण्यापासून संरक्षण होते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
बदलत्या ऋतूंमध्ये आजारांपासून स्वतःचे रक्षण करायचे असेल, तर तुम्ही हळदीसोबत काळी मिरी खाण्यास सुरुवात केली पाहिजे. काळी मिरीमध्ये पाइपरिन आढळते, जे हळदीसोबत घेतल्यास तुमच्या शरीराला त्याचे फायदे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते. हे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि जळजळ देखील रोखते.
हळदीसोबत आल्याचे सेवन करणे देखील तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. या दोन घटकांचे एकत्र सेवन केल्यास, सांधेदुखीपासून मुक्तता मिळते. तसेच आपले पचनही सुधारते.
हळद आणि लिंबूचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय, जेव्हा तुम्ही या दोन्ही घटकांचे एकत्र सेवन करता तेव्हा तुमचे शरीर संसर्गांशी अधिक चांगल्या प्रकारे लढण्यास सक्षम होते.
उत्तम आरोग्यासाठी मासांहरींनी आहारात हे समाविष्ट करायलाच हवे, वाचा
घशाची समस्या असेल तर हळद आणि मधाचे सेवन करायला सुरुवात केली पाहिजे. हे दोन्ही घटक घशाला आराम देतात. मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात ज्यामुळे ते जंतूंशी लढते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते.























































