
आयपीएलच्या अंतिम सामन्यात बंगळुरूने चौथ्यांदा दिमाखात ‘एण्ट्री’ केलीय. त्यामुळे अंतिम सामना हा विराटचाच असेल, या सामन्यात तोच अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल आणि आरसीबीला जगातील सर्वात मोठय़ा टी-20 लीग स्पर्धेचे पहिलेवहिले विजेतेपद मिळवून देईल, असा विश्वास दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू ऍबी डिव्हिलियर्सने व्यक्त केला आहे.