परीक्षण- धर्मपरिचय व धर्मचिकित्सा

>> जगदीश काबरे

उपांतीच्या ओघात माकडापासून माणूस जन्माला आला. मग त्याला देवाधर्माची गरज केव्हापासून वाटायला लागली? या प्रश्नाचा विचार करता आपल्या असे लक्षात येते की, आदिमानव प्राणीसदृश होता. त्यामुळे फक्त आहार, मैथुन, निद्रा एवढय़ाच गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत होत्या. जसजसा तो उपांत होत गेला आणि त्याला चाकाचा, अग्नीचा, शेतीचा शोध लागला, त्यानंतर तो भटक्या अवस्थेतून एका जागेत स्थिरावण्याच्या अवस्थेत गेला. एका जागी स्थिरावल्यानंतर तो स्वसंरक्षणासाठी टोळय़ा करून राहू लागला. त्याच काळात तो निसर्गाच्या अगम्य आणि अज्ञात गोष्टीविषयी विचार करू लागला.

ज्या अर्थी आपल्याला या निसर्गातून अन्नपाणी मिळते आणि आपण जगू शकतो त्या अर्थी हे देणारा कोणीतरी नियंता असला पाहिजे, असे त्याकाळी त्याला वाटले. त्यातून देवाची निर्मिती झाली. पण त्या काळचे त्याचे देव निसर्गातील वरुण म्हणजे वारा, पर्जन्य म्हणजे पाऊस, सूर्य म्हणजे अग्नी, चंद्र म्हणजे शीतलता इ. अशा नैसर्गिक वस्तू हेच होते. म्हणजे सुरुवातीला तो निसर्गपूजक होता. नंतर जसजशा टोळय़ा मोठय़ा होऊ लागल्या तसतसे त्यांच्यात कुणीतरी एक बलवान माणूस सरदार बनू लागला. नंतर असे संरक्षणकर्ते स्वतला राजा म्हणू लागले.

काळ बदलत होता आणि इतिहास घडत होता. नंतरच्या पिढय़ांनी इतिहासातील अशा समाजाला दिशा देणाऱया राजांना त्यांच्या परामामुळे देव म्हणायला सुरुवात केली. मग माणूस निसर्गपूजक अवस्थेतून व्यक्तीपूजेकडे वळला. त्यातून समाज नीतीनियमाने चालावा म्हणून त्यांचे पालन करण्यासाठी काही कर्मकांड आले. अशी कर्मकांडे जोपासणारा एक वर्ग समाजात निर्माण झाला. या वर्गाने समाजाला एका विशिष्ट विचाराने बांधून ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती केली. काही धाडसी माणसे पृथ्वीवर वेगवेगळय़ा ठिकाणी स्थलांतर करू लागली. त्यांनी या नव्या जगात आपला वेगळा धर्म स्थापन केला. अशा प्रकारे या पृथ्वीवर एकाचे अनेक धर्म निर्माण झाले. म्हणून आजही आपल्याला या सर्व धर्मात काही मूलतत्त्वे सारखीच दिसतात. भाषा जरी वेगळय़ा असल्या तरी काही शब्दही अर्थासहित सारखेच असलेले दिसतात.

अशा सर्व धर्मांच्या तत्त्वांविषयी समग्रपणे सामान्य लोकांना कल्पना असतेच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटतो आणि इतरांचा कनिष्ठ. खरे तर प्रत्येकाने आपापल्या धर्माचाही व्यवस्थित अभ्यास केलेला असतोच असे नाही. डॉ. शरद अभ्यंकर यांच्या मनात हा विचार आला. लोकांना सर्व धर्म व्यवस्थितपणे समजावेत, त्यातील खाचाखोचा, गुण आणि दोष लक्षात यावेत या उद्देशाने त्यांनी `भारतातील प्रमुख धर्म’ (सच्चा भूमिकेतून घडवलेला धर्मपरिचय) या नावाचे एक पुस्तक लिहिले. यात धर्मांविषयी माहिती असली तरी ती त्यांनी अत्यंत सहज सोप्या आणि ओघवत्या भाषेत वर्णित केलेली आहे. त्यामुळे हे पुस्तक कुठेही जडजंबाल झालेले नाही. भारतातील प्रमुख धर्माविषयी माहिती देताना त्या धर्माचा उगम आणि उद्गाता कोण याची माहिती देता देता त्या-त्या धर्मात शिरलेल्या अंधश्रद्धा आणि धर्ममार्तंडांनी हितसंबंध जोपासण्यासाठी पोखरलेला धर्म कसा टाकाऊ झालेला आहे, हेही विशद केलेले आहे. हे सांगताना त्यांनी खुसखुशीत भाषेतून बारीक-बारीक चिमटेही काढलेले आहेत. चिमटय़ामुळे शरीराला होणारी वेदना जशी सुसह्य असते तसेच या पुस्तकातील धर्म चिकित्सेचे झाले आहे. हे म्हणजे असे झाले की, एखाद्याचे दोष सांगताना `तू मूर्ख आहेस’ असे सरळ न म्हणता `तुम्ही महाविद्वान आहात’ असे म्हणण्यासारखे आहे. पण लोकांना परखड सत्य झोंबते. त्यामुळे शालजोडीतूनच हाणले पाहिजे, हे लेखकाला चांगलेच कळले आहे, असे त्यांच्या लेखनातून जाणवते. अर्थात हे अत्यंत कठीण काम आहे. पण ते लेखकाने लीलया पेलले आहे. कसे ते आपण पुस्तकातील काही नमुन्यातून पाहूया…

1) मी सातारच्या वैद्यक महाविद्यालयात शिकवण्यासाठी जात असे. आमचे एक सह-प्राध्यापक ज्यू होते, ते भारत सोडून इस्रायलला जाणार होते, त्यांना कॉलेजतर्फे निरोप समारंभ झाला आणि इथले सर्व पाश सोडून आपल्या धर्मभूमीकडे जाणाऱया त्या

डॉक्टरांचे सर्वांनी गुणगान केले. मला वाटले हाच एखादा मुस्लीम डॉक्टर पाकिस्तानात जात असता तर त्याला `खाना यहां का और गाना वहां का!’ अशा शिव्या खाव्या लागल्या असत्या. (पृष्ठ ाढ. 22)

2) काही वर्षांपूर्वी आम्ही जपानमध्ये प्रवास करत होतो. त्यावेळी बुद्ध पौर्णिमा होऊन काही दिवस झाले होते. आम्हाला टोकियो शहरात मोठमोठी बुद्ध मंदिरे दाखवण्यात आली. आम्ही आमच्या गाईड महिलेला विचारले `तुमच्याकडे बुद्ध पौर्णिमेला काय कार्पाम झाले?’ यावर तिने विचारले `कसली बुद्ध पौर्णिमा?’ आम्ही `बुद्धाज बर्थ डे, फुल मून डे’ असे सांगितल्यावर ती म्हणाली `देवळातल्या पुजाऱयांनी काही कार्पाम केले असतील. इतरत्र आम्ही काही करत नाही.’ आमच्याकडे या दिवशी सुट्टी असते आणि बरेच सार्वजनिक कार्पाम होतात, असे सांगितल्यावर ती म्हणाली, `जपानमध्ये एकही धार्मिक सुट्टी नसते.’ यावर मी सांगितले की आमच्याकडे सात धर्मांच्या अनेक सुट्टय़ा असतात. त्यावर तिने `आता समजले तुमचा देश का मागासलेला आहे,’ अशा नजरेने आमच्याकडे पाहिले. (पृष्ठ ाढ. 113) 3) एकंदरीत धर्म म्हटले की त्याचा प्रचार करण्यासाठी आणि रक्षण करण्यासाठी बराच अधर्म करावा लागतो, हेच खरे. (पृष्ठ ाढ. 125) या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते की, त्यांनी सर्व धर्म आणि धर्मियांची चिकित्सा केलेली आहे. त्या पुस्तकाचे सार सांगताना प्रस्तावनेत सुरेश द्वादशीवार लिहितात…

`या पुस्तकात ज्यू आणि हिंदू या अतिशय प्राचीन धर्मापासून शीख व बहाई या अलीकडे जन्माला आलेल्या धर्मांचीही रोचक ओळख त्यांनी वाचकांना करून दिली आहे. ते करताना त्यांनी धर्मांच्या मूळ ग्रंथांची ओळख व त्यातील आचारांची महती तर सांगितलीच, पण त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष व्यवहारात त्यांची केलेली मोडतोडही सांगितली आहे. सर्व धर्मांत काळानुरूप झालेले बदल, त्यातील प्राचीन नीतिमूल्यांची नंतरच्या काळात झालेली परवड आणि धर्मांनी निर्माण केलेल्या समाजव्यवस्था या साऱयांचे विवरण करतानाच अभ्यंकरांनी या धर्मांनी समाजातील दुबळय़ा वर्गांवर व विशेषत स्त्रियांवर कायमस्वरूपी लादलेल्या अन्यायाचे वर्णनही स्पष्टपणे सांगितले आहे.

एकंदरीत हे पुस्तक भारतातील प्रमुख धर्मांची नुसती माहिती देत नाही तर वाचकाने अंतर्मुख होऊन आपापल्या धर्माचा अभ्यास करून त्यात शिरलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी चिकित्सा करण्यास आणि इतर धर्मांचाही अभ्यास करण्यास उद्युक्त करते. हे पुस्तक लिहिताना त्यांनी कोणत्याही धर्माचा, धर्म संस्थापकाचा वा तो धर्म मानणाऱया लोकांचा अवमान केलेला नाही; तर सभ्य पण स्पष्ट शब्दात काही गोष्टी सुनावलेल्या आहेत.

भारतातील प्रमुख धर्म

लेखक : डॉ. शरद अभ्यंकर

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

पृष्ठे : 200, किंमत : रुपये 270