
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी संघाने दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत महिला क्रिकेटचे नवे जगज्जेते होण्याचा इतिहास रचला. महिला संघाच्या या विजयाने संपूर्ण हिंदुस्थानात जल्लोष झाला. या कामगिरीसाठी बीसीसीआयने देखील विश्वविजेतींना मोठे गिफ्ट दिले आहे. बीसीसीआयने महिलांच्या टीम इंडियासाठी 51 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.
BCCI Secretary Devajit Saikia announces ₹51 Crore cash reward for the Indian Women’s cricket team after it won the ICC Women’s World Cup https://t.co/NkU9VOC3jB
— ANI (@ANI) November 2, 2025
1978 सालापासून सुरू झालेलं स्वप्न अखेर 47 वर्षांच्या दीर्घप्रतीक्षेनंतर हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या रणरागिणींनी साकारलं. टीम इंडियाच्या विजयानंतर डी.वाय. पाटील स्टेडियम फटाक्यांनी उजळून गेले होते. 2005 आणि 2017 मध्ये अंतिम सामन्यात मात खालेल्या टीम इंडियाने अखेर या सामन्यात बाजी मारत विश्वविजेतेपद पटकावले. शेफाली वर्माने आजच्या इतिहासाचे सुवर्ण पान आपल्या झंझावाती फलंदाजी आणि तितक्याच भन्नाट गोलंदाजीने लिहिले. पाया वर्माने रचला तर त्यावर जगज्जेतेपदाचा कळस दिप्ती शर्माच्या फिरकीने चढवला.
47 वर्षांची प्रतीक्षा संपली…
महिला वर्ल्ड कपचा जन्म 1973 साली झाली. त्यानंतर आतापर्यंत 12 वेळा वर्ल्ड कप खेळला गेला आणि त्यात वर्ल्ड कप आपलीच मक्तेदारी असल्याचे दाखवत ऑस्ट्रेलियाने तो सात वेळा आपल्याकडेच ठेवला. इंग्लंडने चार वेळा जिंकण्याचा पराक्रम केला, तर न्यूझीलंडने 2000 साली पहिल्यांदा त्यावर आपला हक्क गाजवला. म्हणजे आतापर्यंत हे तीनच देश जगज्जेते ठरले होते आणि 25 वर्षांनंतर महिला क्रिकेटला हिंदुस्थानच्या रूपाने नवा जगज्जेता लाभला. विशेष म्हणजे हिंदुस्थानने 47 वर्षांच्या संघर्षानंतर महिला वर्ल्ड कपवर आपले नाव कोरण्याची किमया साधली. हिंदुस्थानी संघाइतकी प्रतीक्षा कुणालाही करावी लागली नाही. इंग्लंडने पहिल्याच स्पर्धेत आपले जेतेपदाचे स्वप्न साकार केले तर पुढच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन टीम जगज्जेती ठरली. न्यूझीलंडला आपले जगज्जेतेपदाचे स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल 27 वर्षे वाट पाहावी लागली होती. 2000 साली त्यांनी आपली जगज्जेतेपदाची स्वप्नपूर्ती केली होती.
हिंदुस्थानला 47 वर्षे आणि दोन अंतिम सामन्यांतील पराभवानंतर हे यश संपादता आले आहे. सर्वप्रथम 2005 साली आपण अंतिम फेरीत पोहोचलो, पण ऑस्ट्रेलियाने आपल्याला चिरडले तर 2017 साली इंग्लंडने आपले स्वप्न धुळीस मिळवले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतच पराभूत झाल्यामुळे हिंदुस्थानच्या मार्गातील मोठे अडथळे दूर झाले आणि हिंदुस्थानी महिलांनी वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले.
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत
कधी एखादा खेळाडू फक्त सामना जिंकत नाही, तर इतिहास लिहितो आणि तो इतिहासात आता हरमनप्रीत काwरने लिहिला आहे. आतापर्यंत हिंदुस्थान वन डे क्रिकेटमध्ये जगज्जेतेपद कपिलदेव आणि महेंद्रसिंग धोनीने पटकावले होते. आता त्या पंक्तीत हरमनप्रीतही बसली आहे.
हिंदुस्थानी संघाला अंतिम फेरी गाठून देणाऱ्या खेळाडूंच्या




























































