
बिहारमधील मतदार यादी छाननी (एसआयआर) पूर्ण झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने देशव्यापी छाननीची तयारी सुरू केली आहे. पुढच्या आठवडय़ात याबाबत घोषणा होणार असून 2026 मध्ये विधानसभा निवडणुकीला सामोऱया जाणाऱया राज्यांना पहिले प्राधान्य असेल. महाराष्ट्रासह काही राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरच ही प्रक्रिया सुरू होईल.
पीटीआयने हे वृत्त दिले आहे. त्यानुसार देशातील 12 ते 15 राज्यांत एसआयआरचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात आसाम, तामीळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, प. बंगालचा समावेश असेल.
महाराष्ट्रासह काही राज्यांत लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक निवडणूक यंत्रणा त्या कामात असल्याने त्यांना एसआयआरवर लक्ष पेंद्रित करता येणार नाही. त्यामुळे या राज्यांत मतदार फेरछाननी निवडणुकीनंतरच होणार आहे.
आयोग काय भूमिका मांडणार?
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील मतदार यादीतही अनेक घोळ आहेत. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी निवडणूक अधिकाऱयांची भेट घेऊन नुकतेच याचे पुरावे दिले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार याद्या दुरुस्त कराव्यात, अशी मागणी केली. राज्य निवडणूक अधिकाऱयांनी याबाबत पेंद्रीय निवडणूक आयोगाला कळविले आहे. त्यामुळे पुढील आठवडय़ात होणाऱया पत्रकार परिषदेत निवडणूक आयुक्त काय भूमिका मांडणार हे पहावे लागेल.



























































